पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रांकांत पाटील यांच्याशी दैनिक प्रभातने विशेष संवाद साधला. यावेळी पाटील यांनी, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
करोना संकटाच्या काळात भाजपने नागरिकांना केलेली मदत, पक्षाच्या पुण्यातील आमदारांची कामगिरी, पिंपरी चिंचवड येथील पक्ष संघटनेतील बदलांच्या चर्चा याबाबतच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.