लखनौ – उत्तरप्रदेश पोलिसांनी बुधवारी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे त्या प्रकरणात आतापर्यंत सहा जण गजाआड झाले आहेत.
अंकित दास आणि लतिफ या दोन आरोपींनी मंगळवारी शरण येण्याची तयारी दर्शवली.
त्यानंतर ते प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकापुढे (एसआयटी) हजर झाले. त्या दोघांनाही अपेक्षेप्रमाणे अटक करण्यात आली. गजाआड झालेल्या इतर आरोपींमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषचाही समावेश आहे.
त्याला हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, स्थानिक न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने त्याला कुठला दिलासा मिळू शकला नाही.