Mallikarjun Kharge । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी आता एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्याच पार्श्ववभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक प्रचार आणि रॅली यांचा धुरळा उडाला. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना रंगला आहे. त्यातच एका प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांना आता भावनिक साद दिल्याचे दिसत आहे.
मी राजकारणातून संन्यास घेणार नाही Mallikarjun Kharge ।
अफजलपूर येथील सभेत प्रचार सभेदरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी“मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार. एखाद्या पदावरुन निवृत्ती घेतली जाऊ शकते. मात्र आपल्या तत्त्वांपासून आणि सिद्धांतापासून कधीही निवृत्ती घेऊ नये. भाजपा आणि संघाच्या विचारधारेचा पराभव करण्यासाठीच मी राजकारणात आलो.” असे त्यांनी म्हटले.
मतदान कुणालाही करा पण अंत्ययात्रेला.. Mallikarjun Kharge ।
पुढे बोलताना त्यांनी, “काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मत दिलं नाहीत तर मला वाटेल की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही. मी तुम्हाला एक आवाहन करु इच्छितो की भले तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका, मात्र तुम्हाला माझ्या अंत्यसंस्काराला यावं लागेल, त्यावेळी नक्की या.” असे म्हणत खरगे भावूक झाल्याचे दिसून आले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये ते पराभूत झाले होते. कलबुर्गी हा त्यांचा जिल्हा आहे. त्यातील अफजलपूर या ठिकाणी रॅली दरम्यान बोलत असताना खरगे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंचा विचार व्हावा अशी काही काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. मात्र याबाबतचा प्रस्ताव हा अंतिम होऊ शकला नाही. आता खरगे काँग्रेसचा प्रचार करत आहेत. त्यांच्या भाषणादरम्यान ते भावनिक झाल्याचं पाहण्यास मिळालं.
हेही वाचा
“कॉंग्रेस संपली म्हणता, मग कॉंग्रेसची इतकी चिंता का करता? मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींना सवाल