जळोची : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एका नागरिकाने शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव थांबवण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे केली. यावर पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर देताना सांगितले मी काय करतो साहेबांना सांगतो साहेब तुम्ही जनावरांकडे बघताय की, कुत्र्याकडे साहेब म्हटले मी जनावरांकडे बघतो. तर मग मी कुत्र्याकडे बघतो अन् सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ अरे काय चेष्टा चाललीय. मी या संदर्भात एका झटक्यात बंदोबस्त करेन असे म्हणत शहरात भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक कोंडवडा तयार करा.. बास झाली नाटक.. जनावरे कोणाचीही असली तरी पकडून कोंडवाड्यात टाकून पाच ते दहा हजार रुपये दंड आकारा म्हणजे हे थांबेल आणि भटक्या श्वानांची नसबंदी करू असे सांगितले.
विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. पाहणी नंतर त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण केले… यानंतर त्यांनी येथील आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले.
आमदाराचा बाप असला तरी नियम सारखाच…
बारामती जेजुरी हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात.. पार करता येते. नागरिक आता गाड्या जोरात जात असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी करत आहेत.. यावर पवार म्हणाले की, रस्तेही चांगले करायचे.. त्यावर गतिरोधक करायचे.. असे म्हणत नागरिकांनीही वेगावर मर्यादा ठेवली पाहिजे.. सध्या पुणे मुंबई हायवेवर शंभरच्या पुढे वाहनाचा वेग असल्यास परस्पर दोन हजार रुपयांचा दंड आकारला जातो… याबाबत एका आमदाराचे उदाहरण देत पवार म्हणाले की, ते आमदार म्हणाले की, माझा पगार इतका आहे. मी इतक्यांदा आलो गेलो… तर मला 50 हजार रुपये दंड बसला. त्यामुळे आमदार असो वा आमदाराचा बाप. नियम सर्वांना सारखाच.
पुढे बोलताना म्हणाले, सत्ता असो वा नसो बारामतीच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आपली कामे ठरलेल्या वेळात पूर्ण होतील..असे सांगायलाही पवार विसरले नाहीत..