मुंबई : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेला आक्रमकपणे हा संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले मुख्यमंत्रीपद अमान्य असणं ही राक्षसी महत्वाकांक्षा असल्याचे ते म्हणाले.
विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलतायत त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल. असे ते म्हणाले. मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हण्टलं आहे. हे सगळं भाजपने केलं आहे. त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. माझा फोटो शिवसेनेचं नाव न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आणि मंत्र्यांना दिले आहे.
मी मोह सोडलाय
बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केले ? एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली संजय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी सांभाळलं असे ठाकरे म्हणाले . झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असं देखील ते म्हणाले. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केलं गेलेल्यांना त्यांनी यावेळी सुनावले आहे.