मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.
मी मोह सोडलाय
बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केले ? एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी सांभाळलं असे ठाकरे म्हणाले . झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असं देखील ते म्हणाले. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केलं गेलेल्यांना त्यांनी यावेळी सुनावले आहे.
हे सगळं भाजपनं केलं
मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हण्टलं आहे. हे सगळं भाजपने केलं आहे. त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे.