औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायलायचे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते अँक्टीव्ह झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावरून ते आक्रमक आहेत. आता त्यांनी थेट शिवसेनेला डिवचलं आहे. ऍड. गुणरत्न यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिवाकर रावते यांना चॅलेज केलं आहे.
औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होतेय. शिवसेनेने ही मागणी अनेकदा लावून धरली आहे. मात्र अद्याप हे होऊ शकल नाही. मात्र शिवसेनेकडून औरंगाबादला संभाजीनगर संबोधलं जात. यावर ऍड. गुणरत्न यांनी आक्षेप घेतला आहे.
शिवाजी महाराज-संभाजी महाराजांचं एकेरी नाव घेण्यावरुन ऍड सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांना इशारा दिला आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजी नगर म्हणालात तर ठीक अन्यथा तुम्हाला न्यायलायत उभा करतो, असं सदावर्ते यांनी म्हटलं.
शिवसेनेचे नेते औऱंगाबादला सातत्याने संभाजीनगर म्हणतात. एकतर एकेरी नाव घ्यायच नाही. यापुढे जर एकेरी नाव घेतल तर न्यायालयात उत्तर द्यायला तयार रहा, असंही सदावर्ते यांनी म्हटलं. सदावर्ते औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.