Maharashtra weather update । राज्यात सकाळी थंडी तर दुपारी ऊन असा बदल नागरिकांना जाणवत आहे. अशात राज्यातील विदर्भातल्या काही भागात अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिला. अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाने झोडपले.
पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ तासांत गारपिटीसह आणि पाऊस पडू शकतो. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, 12 फेब्रुवारीपासून 30-35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. आजचे हवामान कोरडे असले तरी थंडी राहील. सकाळी आणि संध्याकाळ थंडी जाणवेल. म्हणजे अजून हिवाळा गेलेला नाही. पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Nikhil Wagle। पुणे पोलिसांनी सांगितले,’निखिल वागळे यांनी नेमकी कोणती चूक केली ?’
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही दिवस ही परिस्थिती राहणार आहे. रविवारी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर मारठवड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून जालना, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्याला यलो अलर्ट जारी, ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता दर्शविली जात आहे.
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.\
हेही वाचा
Ajit Pawar । अजित पवारांची थेट सरड्याशी तुलना,’सरडा रंग बदलतो, पण कुठं आलोय हेच विसरतो..!’