तिरुवनंतपुरम – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी निधी न दिल्याने भाजीपाला विक्रेत्याला धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. केरळमधील कोल्लममध्ये भारत जोडो यात्रेसाठी 2000 रुपये न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याशी गैरवर्तन केले. भाजीचे दुकान चालवणारे एस फवाज म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांची एक टीम त्यांच्या दुकानात पोहोचली होती. त्याच्याकडे ‘यात्रे’साठी देणगी मागितली. 500 रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले मात्र कार्यकर्त्यांनी 2000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर तराजूचे नुकसान करून भाजीपाला फेकून दिला. कार्यकर्त्यांनी दुकानाचे नुकसान केले आहे.
दरम्यान, निधी न दिल्याने दुकानदाराला धमकावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुधाकरन यांनी पक्षाच्या संबंधित तीन कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे.
Kerala | Vegetable shop owner threatened by Congress workers for not contributing Rs 2000 in fund collection for ‘Bharat Jodo Yatra’ in Kollam
(Photo source: Screenshot from viral video) pic.twitter.com/vzQaRWqwiB
— ANI (@ANI) September 16, 2022
11 सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा केरळमध्ये दाखल झाली आहे. केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी 19 दिवसांच्या कालावधीत 450 किमीचा प्रवास करून मलप्पुरममधील निलांबूरला जातील. ही यात्रा 14 सप्टेंबर रोजी कोल्लम जिल्ह्यात पोहोचली होती. त्यानंतर 17 सप्टेंबरला अलाप्पुझा येथे पोहोचेल आणि 21-22 सप्टेंबरला एर्नाकुलम जिल्ह्यातून 23 सप्टेंबरला थ्रिसूरला पोहोचेल. यानंतर प्रवासाचे इतर टप्पे असतील.
कन्याकुमारी ते काश्मीर या प्रवासात काँग्रेस नेते ३५७० किमीचे अंतर पार करतील. पक्षाने राहुल गांधींसह 119 नेत्यांना “भारत यात्री” असे नाव दिले आहे, जे कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत जाणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी प्रियांका गांधीही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – गौतम अदानी बनले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती; कमालीच्या वेगाने वाढतेय संपत्ती
हेही वाचा – लालबागच्या राजाच्या वस्तू लिलावातून मिळाले “इतके’ कोटी रुपये