नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील बाबुपुरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताटमिल चौकाजवळ एका भरधाव बसने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर काटा आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. बाबुपुरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताटमिल चौकात ही घटना घडली.
Uttar Pradesh | At least five people killed and several injured in an electric bus accident in Kanpur. The incident took place near Tat Mill cross road: Pramod Kumar, DCP East Kanpur pic.twitter.com/ZzVsKMOYuZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 30, 2022
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका सेवा तत्काळ रवाना करण्यात आली. मृतांची संख्या ५ ते ६ असू शकते. बस चालकाचा शोध सुरू आहे. या अपघातात तीन वाहने आणि अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. अनेकांना दुखापत झाली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. उर्वरित कायदेशीर कारवाई सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, जखमींवर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.