Lok Sabha Election 2024 । केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या उमेदवाराचा पराभव करू शकतील अशा उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी केले. सध्याच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाकडून नाही तर भांडवलदारांच्या गटाकडून लढल्या जात आहेत, कारण भांडवलदारांच्या एका गटाने देश ताब्यात घेतला आहे.असाही आरोप त्यांनी केला आहे.
१९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्प्यात मतदान झाले आहे. यूपी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि चंदीगडसह 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 100 हून अधिक जागांसाठी 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे.
वृत्तसंस्थेनुसार,राकेश टिकैत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. भाजपला पराभूत करू शकणाऱ्या उमेदवाराला मत द्या, हे भाजप सरकार नसून भांडवलदारांच्या टोळीचे सरकार आहे. या टोळीने देशाचा ताबा घेतला असून निवडणूक लढवत आहे. निवडणुकीत त्यांना कोणीही साथ देत नाही. भारतातील लोक आणि ही टोळी यांच्यात ही थेट निवडणूक आहे. जनता ही निवडणूक लढवत आहे. काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या भागात भाजपचा पराभव करू शकेल अशा उमेदवाराला मतदान करा.
ते पुढे म्हणाले की,’फोन कॉल्सद्वारे मतदारांची “दिशाभूल” केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये काही उमेदवारांबद्दल चुकीच्या पद्धतीने निवडणुकीशी संबंधित चर्चा केली गेली. हरियाणा असो, दिल्ली असो, पंजाब, उत्तर प्रदेश असो की उर्वरित देश, उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना मोर्चाने दिल्या आहेत.
लोक सरकारच्या धोरणांबद्दल राग व्यक्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (ईव्हीएम) नोटा पर्याय निवडतात. त्यामुळे NOTA दाबल्याने सरकारला थेट मदत होते. NOTA दाबू नका, तुमच्या उमेदवाराला मत द्या, निराश होऊ नका. ही जनतेची निवडणूक आहे आणि निकाल काहीही लागला तरी लोक ही निवडणूक लढवत आहेत. संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे.
Lok Sabha Election 2024 । सरकार कोणाचेही बनले तरी चालेल
टिकैत म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे सरकार असो, एसकेएम भूसंपादन, शेती कर्जमाफी, पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वर कायदेशीर हमी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, आदिवासी हक्क, जंगलतोड, शिक्षण आणि त्यांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करेल.