पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
नवी दिल्ली : आसाममध्ये नुकतीच शेवटची एनआरसीची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत लाखो लोकांना नागरिकत्वाचा दर्जा देण्यात आला नाही. त्यातच आता गोरखा समुदायातील लाखा लोकांची नावे आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या यादीतून वगळण्यात आल्याचे पाहून आपल्याला धक्का बसल्याचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच मुळ भारतीय एनआरसीतून सुटणार नाहीत हे केंद्र सरकारने निश्चित करावे, याचाही ममता बॅनर्जी यांनी पुनरुच्चार केला.
सर्व भारतीय बंधूभगिनींबाबत न्याय व्हायला हवा, असे तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एनआरसीचा विचका झाल्याबद्दल यापूर्वी मला माहिती नव्हती. आता जसजशी आणखी माहिती येते आहे, तसे लाखाहून अधिक गोरखांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे पाहून मला धक्का बसला आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात ममता यांनी म्हटले आहे. सीआरपीएफचे आणि इतर जवान, तसेच माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे कुटुंबीय यांच्यासह हजारो खऱ्याखुऱ्या भारतीयांची नावे यादीतून वगळली गेली आहेत, असाही दावा ममतांनी केला.