Sharad Pwar on Ulhasnagar Firing – भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कक्षात गोळीबार करत कायदा व सुव्य्सवस्थेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी, महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना चिंताजनक असल्याचं म्हटलंय.
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात शुक्रवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pwar on Ulhasnagar Firing
“सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळते. महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत.” असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यभरातून शिंदे – फडणवीस – पवार सरकारवर टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर दादर पोलीस स्थानकाबाहेर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर पोलिसांनी त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती.
गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर गुन्हा काबुल केला | Ganpat Gaikwad on Ulhasnagar Firing
गोळीबाराची घटना घडल्यानंतर गणपत गायकवाड यांनी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण गोळीबार केला असल्याचं मान्य केलं. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे राज्यभर गुन्हेगार घडत आहेत, आज त्यांच्यामुळेच मी देखील गुन्हेगार झालो असं देखील ते झी न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले.