पुणे – राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा विषय आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी गेल्या दीड वर्षात राज्यातून गायब असलेल्या महिला आणि मुलींची आकडेवारीच वाचून दाखवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळेंवरून केलेल्या आरोपाला देखील यावेळी पवार यांनी प्रत्युत्तर दिल.
“माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने ३ वेळा निवडून आली आहे. पूर्वजांची पुण्यायी एकदाच उपयोगी पडते. पण दुसरी आणि तिसरी निवडणूक त्यानंतर पार्लमेंटच्या परफॉर्मन्समध्ये ९८-९९ टक्के अटेन्डन्स यामध्ये उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला आहे अशी माहिती पवारांनी यावेळी दिलो.
तसेच ते पुढे म्हणाले,”मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे मोदींचं वक्तव्य हे अशोभणीय आहे” असं स्पष्ट अंत पवारांनी मोदींच्या टीकेवर व्यक्त केलं.
काय म्हणाले होते पंतप्रधान राष्ट्र्वादीबाबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला. तसेच शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, असा टोला लगावला होता.
फडणवीसांवर निशाणा
यावेळी बोलताना पवार यांनी काही जिल्ह्यातील महिलांच्या गायब असल्याची आकडेवारी सांगितली. पवार म्हणाले,”पुण्यातून ९३७,मुंबई ७३८,सोलापूर ६२,ठाणे ७२१ मुली किंवा महिला गायब आहेत.२३ जानेवारी ते २३ मे दरम्यान एकूण २४५८ महिला बेपत्ता असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. तसेच राज्यातून एकूण गेल्या दीड वर्षात ६ हजार ८८९ मुली किंवा महिला बेपत्ता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.