मुंबई – शरद पवार यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावरुन आज केंद्र सरकारसमोरकाही प्रश्न उपस्थित केले आहेत. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “एकाच देशात दोन कायदे नको असं पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे.
शिख समाज, जैन समाज वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याबाबत शीख आणि जैन समाजाने आपली भूमिका स्प्ष्ट करावी.
तसेच, संपूर्ण माहिती घेऊन समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादी आपली भूमिका घेईल. समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, जनतेचं लक्ष विचिलित करण्याचा सध्या भाजपचा प्रयत्न सुरु आहे. असं शरद पवार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप पक्षावर देखील टीका केली आहे. “कर्नाटक, राजस्थान, पंजाब या ठिकाणी भाजपची सत्ता नाही. गोवा, महाराष्ट्र, मध्यमप्रदेश अश्या काही ठिकाणी आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केलेली आहे. पुढीवर्षी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाची हालचाल सुरु आहे’. अशी खोचक टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना शरद यांनी अनेक मुद्यांवर आपली भावना व्यक्त केली.