मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंसह शरद पवार हे देखील राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करताहेत या भाजपच्या आरोपाला आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊत्तर दिल. “कारण नसताना त्यांना आज तुरुंगात टाकले आहे” असे स्पष्ट मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधत पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
या लोकांनीच राऊत यांना जेलमध्ये टाकलाय आणि आमच्यावर आरोप करताहेत की आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलं. खरं म्हणायचं तर हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आहे. अनिल देशमुख असो,नवाब मलिक असो किंवा संजय राऊत असो काहीही कारण नसताना या लोकांना आत टाकलेलं आहे. असं स्पष्ट मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं.
मोदींच्या विरोधात एक चेहरा समोर येणार का ? असा सवाल पवारांना यावेळी विचारला असता ते म्हणाले, सगळ्यांची इच्छा आहे एकत्रित काहीतरी करावं पण अद्याप तरी आम्ही कोणत्या निर्णयापर्यंत आलेलो नाही. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले त्यावर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असही पवार यावेळी म्हणाले.