मुंबई – उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वादावर निवडणूक आयोगाने काल निर्णय दिला. आगामी पोट निवडणुकीमध्ये शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीवेळेसचा दाखल देत शिवसेनेला नवीन नाव सुचवलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयनानंतर महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शरद पवारांनी सांगितले. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधत पवारांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सेनेला आता तातपुरते नवे नाव शोधावे लागणार आहे. मी असं नाव सुचविन की, शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे, असं नाव द्यायला पाहिजे, असं म्हणत पवारांनी शिवसेनेला नवे नाव सुचविले.तसेच असं इंदिरा गांधी यांच्यावेळेस देखील झालं असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.
पवारांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
आता शिवसेनेने निवडणुकांना सामोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे.
याअगोदर मी स्वतं: वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, त्याचा काही तोटा होत नाही.
चिन्ह गोठवण्यात येणार याची मला खात्री होती, याने मला आश्चर्य वाटले नाही.
निर्णय कोण घेत हे मला माहित नाही.
शिवसेना पक्ष यामुळे अजिबात संपणार नाही उलट पक्ष जोमाने पुन्हा वाढेल.