Shambhuraj Desai – मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी आता उगीचच आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये, असे आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना केले आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाले आहे. यामुळे शिक्षण व नोकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. सगेसोयऱ्याच्या अध्यादेशावर ६ लाखांहून अधिक हरकती आल्या आहेत. यावर घाईगडबडीत निर्णय घेतला तर भविष्यात तोटा होईल, असे ते म्हणाले आहेत.
सरकार गत ७-८ महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा अभ्यास करत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा. वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही जनतेला वेठीस धरत आहात का? असा सवालही शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
सरकारला ट्रॅप लावण्याची गरज नाही –
अजय बारसकर हे आंदोलनात त्यांच्या सोबत होते. या यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत. सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. काही तक्रार केली तर सरकार दखल घेईल. एकेक गोष्टी बाहेर येत आहेत. जरांगे पाटील यांनी नकारार्थी विचार थांबवावा, सरकारची यंत्रणा मोठी आहे. ट्रॅप लावण्याची गरज नाही, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.