नीरा नरसिंहपूर- सेवा केंद्राच्या माध्यमातून शासनाचे विविध दाखले, योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे, असे सरपंच रमेश कोकाटे यांनी सागितले.
सराटी (ता इंदापूर) येथे आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाट्न सरपंच कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आपले सरकार सेवा केंद्रात 7/12 उतारे, विज बिल भरणा, मनी ट्रांन्सफर, तहसीलचे दाखले, उत्पन्न, डोमसिअल, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर आदि सुविधा उपलब्ध झाल्या आहे. या परिसरातील जवळपास 15 ते 20 गावांना याचा लाभ होणार आहे, असेही सरपंच कोकाटे यांनी सांगितले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबा कोकाटे, ऍड. राहुल जगदाळे, मुसाभाई तांबोळी, इन्नुस आत्तार, मुबारक तांबोळी, ग्रामसेवक हनुमंत पाटिल, हुसेन तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते. हुसेन तांबोळी यांनी प्रास्ताविक केले.