नवी दिल्ली- पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांना अटक केल्याप्रकरणी देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
काही घटनांच्या बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ अशी कॅप्शन दिली आहे. फैज अहमद फैज यांच्या कवितेतील या ओळी पोस्ट केल्या आहेत. तसेच, ते (मोदी सरकार) घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहेत.
बोल कि लब आज़ाद हैं तेरे
बोल कि सच ज़िंदा है अब तक!वो डरे हैं, देश नहीं!
India won’t be silenced. pic.twitter.com/jOXWdXLUzY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 15, 2021
काय आहे प्रकरण?
समाज माध्यमांवर देशव्यापी शेतकऱ्यांच्या निदर्शनांबाबतची माहिती पसवणाऱ्या “टूलकीट’च्या प्रसारात सहभागी झाल्याबद्दल बंगळुरू येथील त्यांच्या घरातून 21 वर्षीय पर्यावारणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांना अटक करण्यात आली. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप रविवारी फेटाळून लावले आहेत.
स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी हे “टूलकिट’ वापरून शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणारे ट्विट केल्यानंतर तिच्यावर देशद्रोह, दोन गटांत वैमनस्य पसरवणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर गुन्ह्याखाली चार फेब्रुवारीला गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोएटीक जस्टीस या खलीस्तान वाद्यांच्या गटाच्या सहकार्याने हे “टूलकिट’ बनवल्याचा पोलिसांचा आरोप होता.
कोण आहे दिशा रवी?
रवी ही फ्रायडे फॉर फ्युचर या संघटनेची संस्थापक असून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवीधर आहे.