नवी दिल्ली : देशातील करोनाचा वेग कमी होताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे असून ही समाधानकारक बाब असल्याचे म्हटले जात आहे. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन करोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण करोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/0pPQsPI2V9 pic.twitter.com/MlyB57UZlD
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 29, 2022
महाराष्ट्रात रविवारी 1639 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1698 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,36, 576 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के एवढे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.