श्रीदत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. गेल्या हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता देणार असल्याची माहिती विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री, श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, करण रुपारेल, मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, सूरज बांदल, चीफ इंजिनिअर अजित कदम, को-जन मॅनेजर दीपक मोरे, कॅन मॅनेजर सदानंद पाटील, चीफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले..
डिस्टिलरी मॅनेजर विजय जगताप, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे, ईटीपी मॅनेजर सचिन भोसले, डब्ल्यूटीपी मॅनेजर बुणगे, शेती अधिकारी बागनवर, सुरक्षा अधिकारी अजय कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सचिव राजेंद्र भोसले, पोपटराव भोसले, गोरख भोसले, केनयार्ड सुपरवायझर एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले, सुरेश भोसले, पै. संतोष भोसले, महेश भोसले, संजय जाधव, अमर निंबाळकर, संजय भोसले, शरदराव जाधव, संतोष शेंडगे, शेतकरी व कामगार उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकाच हप्त्यामध्ये देण्यात येते. मात्र, या वर्षी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून संचालक प्रीती रूपारेल आणि जितेंद्र धारू यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अधिकचे 100 रुपये देण्याचे कबूल केले आहे.