नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष, यंदाची दिवाळी तरी गोड होणार का ?
आनंदराव देसाई
चाफळ – राज्यात या वर्षीही अतिवृष्टीने थैमान घातले होते. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच बळी ठरणार बळीराजा याही वेळी बरबाद झाला आहे. शासनाने अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतीचे, घरांचे पंचनामे करून अर्जही भरून घेतले आहेत. आता शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणजे बळीराजाला थोडासातरी दिलासा मिळेल आणि यावर्षीची दिवाळी तरी गोड होइल अशी शेतकऱ्यांच्या आशा आहे. त्यामुळे शासनाच्या भूमीकेकडे लक्ष लागून राहीले आहे.
गत साली प्रत्येक गावातील चार-दोन शेतकरी वगळता भरपाईची एक दमडीही कोणा नूकसानग्रस्ताच्या नावावर जमा झालेली नाही. दिवाळीच्या तोंडावर तरी भरपाई मिळेल आणि आपल्या मूलाबाळांना गोडधोड करता येईल, कपडालत्ता घेता येईल या आशेने बसलेल्या बळीराजाची पूरती निराशाच झाली होती. यावर्षी पंचनामे होऊन तीन महीन्याचा अवधी झालेला आहे.
अजूनही शासनाकडून मदती संदर्भात कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामूळे आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर तरी शासनाने मदत द्यावी व बळीराजांसह त्याची मुलबाळ यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी बळीराजांकडून होत आहे. फक्त यावर्षी शासनाने पंचनामा केलेल्या व खरोखरच नूकसान झालेल्या प्रत्येक नूकसानग्रस्त बळीराजाला मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करून बसला आहे.
आधिच करोनाने डबघाईला आलेला शेतकरी यंदा पावसाळ्यात ही पुरता हतबल झाला. अनेक पावसाळे पहीलेल्या बळीराजासाठी यावर्षीचा पावसाळा माञ आगळावेगळाच ठरला. ज्या शेती व जनावरांवर आपल्या कूटूबांचा उदरनिर्वाह चालतो त्या शेती व जनावरांनाच पावसाने हिरावून नेले. तीन ते चार दिवसच झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड प्रमाणात नूकसान झाले.
आपल्या शेताची हद्द नेमकी कूठपर्यंत आहे हेही ओळखण्यापलीकडे शेती वाहून गेली. काही ठिकाणी जनावरे वाहून गेली तर काही ठिकाणी राहते घरही पावसाने भूईसपाट केले. एक ना अनेक संकटे बळीराजावर कोसळत असताना काही दात्यांनी तात्पूरती जगण्यासाठी मदतीच्या रूपाने ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण तोही तोकडाच होता.
खरी मदत तर शासनांकडून अपेक्षीत असताना शासनाने माञ तीन महीने उलटूनही अजून पर्यंत दमडीचीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. त्यामूळे शासनाने यावेळी तातडीने निर्णय घेऊन दिवाळीपूर्वीच मदत करावी. मागीव वर्षाचा अनुभव पाहता आपला पंचनामा तर केला आहे. गत वर्षी सारखं आपलं नाव मदतीच्या यादीतून गायब तर होणार नाही ना. या विवेचंनेत शेतकरी आप आपसात चर्चा करताना दिसत आहे. त्यामूळे शासनाने यावर्षी पंचनामा केलेल्या नूकसानग्रस्त प्रत्येक बळीराजाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.