मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे.
यारून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे ते म्हणाले,’सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही खिशात असू शकत नाही.’
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकार लादले जाते ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे सरकार संविधानानुसार बनलेले नाही. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे एका आशेने पाहतोय. त्यामुळे याबाबतीत निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल’ असेही राऊत यावेळी म्हणाले.