दिल्ली – राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे.
शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी घेण्याची वनंती केली. मात्र न्यायालयाने तूर्तास तरी याबाबत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे शिंदे गटाला चांगलाच दिलासा मिळालाय. याबाबत विधानसभा अध्यक्षांना देखील सुप्रीम कोर्टाच्यावतीने सूचना देण्यात आल्या आहेत.
Uddhav Thackeray-led Shiv Sena camp mentions its plea before the Supreme Court challenging the election of the new Speaker of the Maharashtra Assembly.
(File pic) pic.twitter.com/poieD8W0ox
— ANI (@ANI) July 11, 2022
काय झालं नेमकं कोर्टात
शिवसेनेची आज सुनावणी घेण्याची मागणी कोर्टाने नाकारली
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेण्यासाठी घटनापीठ नेमावे लागणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आणि घटनापीठ नेमण्यासाठी वेळ लागणार असल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले..
जो पर्यंत यावर सुनावणी होत नाही तोपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दिल्याचे समजते