मुंबई- मोदींनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजवले गेले. आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लावली नाही म्हणजे झालं, असा शब्दातशिवसेनेचे खासदार संजय राऊतयांनी मोदींना टोला लगावला आहे.
👏👏टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते
आता आग 🔥नाही लावली म्हणजे झालं. 😅
साहेब कामाचं आणि लोकांच्या
पोटा पाण्याचं बोलां.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020
दिवा जळेलच, पण सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केलं ते सांगा, असा प्रश्नही त्यांनी ट्विटरवरुन मोदींना विचारला आहे. राऊत हे नेहमी वेगवेगळ्या प्रकारे मोदींवर टीका करत असतात. त्यामुळे या आवाहनावर राऊत काय बोलतात, यावर आ सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी आपली भूमिका ट्विटरवरुन स्पष्ट केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे लावा. एकत्र न येता एकजुटीने कोरोनाविरोधात लढू, असं देशवासियांना आवाहन केलं आहे.