maratha reservation – आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर मागे घेतले. तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत शेवटची वेळ वाढवून देतो’ असे पाटील यांनी सांगितले.
अशात जरांगे-पाटलांनी २४ डिसेंबर, तर सरकारनं २ जानेवारीची मुदत दिली आहे. यावरून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आता यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले आहे. अशात यावर आता शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे माध्यमांशी बोलतांना नेमकी कुठली तारीख आहे यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
संदीपान भुमरे म्हणाले, ‘सरकारने दिलेला जीआर जरांगे यांनी वाचला. मराठा समाजाला न्याय देण्यावर भर आहे, अर्धा-एक दिवस, पुढे-मागे होऊ शकतो, असे भुमरे म्हणाले. तत्पूर्वी, अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेट घेतली होती.
तारखेच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकरवर हल्लाबोल केला होता, ते म्हणाले होते,’जरांगे-पाटलांनी २४ डिसेंबर, तर सरकारनं २ जानेवारीची मुदत दिली आहे. पण, ३१ डिसेंबरला सरकार जाणार आहे. त्यामुळे सरकार जबाबदारी घेण्यास तयार नाही. हे बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणून जरांगे-पाटलांनी २४ डिसेंबर ही तारीख दिली आहे. सरकारला कळून चुकलंय ३१ डिसेंबरला आपले शिर उडणार आहे,” असेही राऊत म्हणाले होते यावर आता शिवसेनेचे नेते प्रतिउत्तर देतांना दिसत आहे.