लातूर – 1870 च्या दशकात पहिले साहित्य संमेलन झाले. साहित्यिकांनी सरकारला मार्गदर्शन करावे. साहित्याचा गाभा हा ग्रंथ आहे. त्याचा विसर पडू देऊ नये. ग्रंथ चळवळीला आणखी भरीव पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. संमेलनातील विचार राज्य सरकार गांभीर्याने घेते.
उस्मानाबाद येथे मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली होती. या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. तसेच राज्य सरकार केंद्र सरकारला मराठीला अभिजात दर्जा देण्याचा पाठपुरावा करीत आहे. 96व्या साहित्य संमेलनाअगोदर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.