कोल्हापूर/प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 2019 ला शेतकरी संकटात असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या अशी मागणी केली होती.. तीच मागणी शरद पवार यांनी आत्ता पूर्ण करावी अशी मागणी रयत क्राती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, त्यामुळे सरकारने ज्या ठिकाणी 25 टक्के पेक्षा जास्त पीक वाया गेलंय, तिथं पंचनामा करण्यापेक्षा थेट मदत द्यावं अस देखील खोत यांनी म्हटलं आहे.. केंद्राकडे बोट दाखवीन्या पेक्ष्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता तात्काळ त्यांच्या खात्यावर टाकावेत अस देखील खोत म्हणालेत…
व्यापाऱ्याने साठविलेल्या कांद्याच्या मालावर किव्हा शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांद्यावर कोणी अधिकारी धाडी टाकायला आले तर त्याचा दांडक्याने समाचार घ्या असा आदेश रायतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत.शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये एक नात आहे, त्यामुळे व्यापाऱ्याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेतकऱ्यांला फटका बसतो अस वक्तव्य देखील सदाभाऊ खोतानी केलाय..
एक आकडा निघणार आहे.. कोल्हापूरात ऊस दाराबाब आंदोलन होणार आहे… साखर कारखानदार सोबत बैठक होणाराय..बैठकीनंतर एक आकडा ठरणार आहे..अस वक्तव्य करत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केलीय.. उसाला इतका दर मिळाला नाही तर ऊसाची कांडी तोडू देणार नाही अशी भूमिका घेण्यापेक्षा ठरलेला दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसा मिळेल हे पहावं अस देखील सदाभाऊ खोतानी म्हटलंय..