मुंबई – जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरेंची मुलाखत देखील घेण्यात आली होती. मुलाखतीदरम्यान बोलताना राज ठाकरे म्हणाले, “एखाद दुसरा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होत नाही,’ असं त्यांनी म्हटलं होत.
परंतु आता याच विधानामुळे राज ठाकरे यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरेंचा महाराष्ट्र राज्याचा किती अभ्यास आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे राज ठाकरे यांना अजूनही महाराष्ट्र समजलेला नाही.
राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे तर राज ठाकरे यांना बेरोजगार मुले दिसत नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेला आहे या अत्यंत चुकीचे वक्त आहे या वक्तव्याबद्दल तात्काळ त्यांनी राज्यातील बेरोजगार मुलांची माफी मागावी.’ असं सचिन खरात म्हणालेत. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे.