नगर –भाजप-शिवसेना महायुतीने मागच्या वेळी रिपब्लिकन मतांचा फायदा घेत केंद्रात व राज्यात सत्ता मिळवीली. परंतु आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेने रिपाइंच्या वाट्याला आलेल्या जागामध्ये उमेदवारी नाकारली.
तसेच शिवसेना ही रिपाइंच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला असून, नगर व श्रीरामपूर येथील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आरपीआय (ए) कार्यकर्त्यांनी आठवलेंना झुगारलेच असल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे दिवंगत पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती, भिमशक्ती एकजुटीचे स्वप्न आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पूर्ण केले. परंतु सध्याचे शिवसेनेचे शहरातील नेतृत्व तसे नाही.