पुणे – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्र रद्द करण्याचे कारण रोहित पवार यांनी सांगितले आहे. जरांगे पाटलांनी पुकरालेल्या आंदोलानाची परिस्थिती दिवसागणिक तीव्र होत आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गावबंदीमुळे यात्रा थांबवली नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच राज्यातील विविध गावांमध्येही साखळी उपषणे सुरु झाली असून अनेक गावकऱ्यांनी पुढारी, नेत्यांना गावबंदी घातली आहे. पण या गावबंदीमुळे यात्रा थांबवली नसल्याचे रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘आम्ही संवदेनशील आहोत. आमचीच मुले आत्महत्या करतात. त्यामुळे आम्ही ही यात्रा पुढे घेऊन जाऊ शकत नाही.’
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘राज्यातील युवा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. या यात्रेचा आज सकाळचा टप्पा जिथे संपला तिथेच आम्ही थांबलो आहोत. पुढे गेलो नाही. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड सगळी कडचे पदाधिकारी येथे आले आहेत. सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. पण आता अशांत झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हायला हवा. त्यासाठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.’
रोहित पवार यांची संघर्षयात्रा काय आहे?
-रोहित पवारांच्या या यात्रेची सुरुवात २४ ऑक्टोबरला शरद पवारांच्या सभेने झाली
-२५ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रेने पुण्यातून नागपूरकडे कूच केलं
-पुणे ते नागपूर असं ८०० किलोमीटरहून अधिकचं अंतर ही यात्रा ४५ दिवसांत गाठणार
-या मार्गावरील जिल्ह्यांमधील युवकांशी संवाद साधून ते प्रश्न जाणून घेणार
-बेरोजगारी, दत्तक शाळांच्या निमित्ताने शिक्षणाचे खाजगीकरण, नोकर भरती
-शिक्षक भरती अशा अनेक मुद्द्यांना या यात्रेत हात घातला जाणार आहे