Rohini Khadse| शरद पवार गटाचा 21 एप्रिल रोजी जळगावच्या जामनेरमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात रोहिणी खडसे यांचे भाषण सुरू असताना त्यांना भाषण उरकरण्याची सुचना करण्यात आली. यादरम्यान त्यांनी कार्यक्रमात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल’, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे? Rohini Khadse|
“मला चिठ्ठी मिळाली लवकर आटपा पण कसे आहे. शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे. एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल. आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथे महिलांना समसमान अधिकार आहेत,” असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही महत्वाचे विधान केले. नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीत भाजपमध्ये जात आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यात मी भाष्य करणार नाही, मात्र आमच्या रक्तात गद्दारी नाही. जेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून आम्ही निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्यासोबत प्रामाणिकपणाने काम केले आहे. नाथाभाऊ या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते ,पण ते मनाला पटत नाही. पण मी पक्षाच्या सोबत राहणार आहे आणि निष्ठेने काम करणार असल्याचे देखील रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार काय म्हणाले ? Rohini Khadse|
दरम्यान, जळगावमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले होते. राज्यात याआधी कधीच कोणावर व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. पण सध्या व्यक्तिगत टीका केली जात आहे. या टीकांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
कदाचित ही वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी. तसेच एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा:
“काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल”; पंतप्रधानांची सडकून टीका