Modi on Congress । लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचाराचा धडाका लागला आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यानंतर आता सर्वजण येत्या २६ एप्रिल रोजी पुढच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार करत आहेत. या सभांमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावताना दिसून येत आहेत. या प्रचारसभांमधून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. परंतु, राजस्थानमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदींनी केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असे म्हटले आहे.
“तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल” Modi on Congress ।
राजस्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी मोदींची प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला.
कांग्रेस की अर्बन नक्सल सोच की नजर अब मेरी माताओं-बहनों के मंगलसूत्र पर है। क्या ऐसी कांग्रेस पर मेरे परिवारजन कभी भरोसा करेंगे। pic.twitter.com/sdPRObgbha
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2024
देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा Modi on Congress ।
पुढे पंतप्रधान,“काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असेही म्हणाले.
काँग्रेस लोकांमध्ये भीती पसरवतेय
दरम्यान, काँग्रेसवर टीका करताना मोदींनी राज्यघटनेचाही उल्लेख केला. “कधीकधी ते दलित आणि आदिवासी जनतेमध्ये भीती पसरवतात. सध्या काँग्रेस राज्यघटना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भीती पसरवत आहे. त्यांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांचं हे खोटं अजिबात कामी येणार नाही. कारण दलितांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे”, असंही मोदी यावेळी म्हणाले.