– राजेंद्र वाघमारे
नेवासा – रस्ता सुरक्षा सप्ताहात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टीओ) यांनी जनतेला नियम व अटी पाळण्याचे आव्हान एकीकडे करायचे अन् दुसरीकडे नियमबाह्य वाहतुकीला आर.टी.ओ. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पडद्या आडून हिरवा कंदिल देण्याचा केविलवाणा प्रताप करत असल्याचा आरोप अनेकदा सामाजिक संघटनेतून केला जात आहे त्यामुळे अनेकदा रस्त्यावर अपघात होवून निष्पाप बालकांचे बळी गेले ? याला जबाबदार कोण ? असा परखड सवालही रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनतेतून उपस्थित केला जात आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून वाहनघारकांना वाहन चालविण्याबाबत आणि नागरीकांना रस्त्यावरुन प्रवास करतांना सुरक्षिततेबाबत या सप्ताह मार्गदर्शन केले जात आहे याबाबत उपप्रादेशिक परिवहन खात्याचे विशेष कौतुक होत आहे माञ आर.टी.ओ.अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना नियम पाळण्याचे आवाहन करणे म्हणजे आपल्या खात्याचा धाक अन् दराराच संपुष्ठात येण्याचा अधिक धोका नाकारता येत नसल्याचे सिद्ध होणे असा ठोबळ मनाचा निष्कर्षही सध्या हवळ्या मनाचे लोक या रस्ता सुरक्षा सप्ताहात काढतांना दिसून येत आहे.
एकीकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना गल्लेलठ्ठ भरमसाठ पगार सुसज्ज कार्यालये थाटलेली असतांना रस्ता अपघात ही अनअपेक्षित घटना मानली जात असली तर या खात्यातून वाहनधारकांना काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली गेली तर अनेक निरापराध लोकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने विशेष मदत होणार असल्याचे मतही वाहतुक संंघटना आणि जनतेतून व्यक्त केली जात आहे.
वाहतुक संघटनेने वेळोवेळी अनधिकृत डबल ट्रॅक्टर ट्रॉली अवजड ऊस वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी या कार्यालयाला अनेकदा निवेदने देऊन आंदोलने करण्यात आलेली आहेत याबाबत वेळीच उपप्रादेशिक परिवहन खात्याने कार्यवाही न केल्याने काष्ठी येथे दोन युवकांचा तर सोनई येथे एका बालकाचा तसेच राहूरी फॅक्टरी येथे दोन युवकांचा तसेच संगमनेर येथे कॉलेज महाविद्यालयीन युवतीचा तर अशोकनगर फाटा येथे दोघा जणांचा झालेला हा मृत्यू कशाचे घोतक आहे असा संतप्त सवालही वाहतुकदार संघटनेतून व्यक्त केला जात आहे या संघटनेच्या निवेदनाची वेळीच दखल अधिकाऱ्यांनी घेतली असती ?
तर जिल्ह्यात असंख्य निष्पाप नागरीकांचे बळी गेले नसते ही वास्तव परिस्थिती असतांना या रस्ता सुरक्षा सप्ताहात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचारी “लोकांस सांगे तत्वज्ञान माञ आपणच कोरडे पाषाण या युक्तीप्रमाणे वावरत नाहीत का ? असा निर्भिड सवालही या निमित्तातून समोर येतांना दिसत आहे या अपघाताला नेमके कोण जबाबदार आहे याचे स्पष्टिकरणही कोण देणार ? असा सवालही संतप्त जनतेतून समोर येतांना दिसून येत आहे.
या रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहनधारकांनी नियमांची अमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या तोऱ्यात राणाभिमदेवी थाटात भाषणे ठोकून सांगतात की,अपघाताने देशाचे व पर्यायाने परिवाराचे नुकसान होते वरील अपघातात जबाबदार परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन करून घरातील व्यक्ती गेल्यावर काय दुःख व पोकळी निर्माण होते हे जाणून घेतले आहे का?
असा सवालही हेच कर्मचारी आता उपस्थित करतांना दिसून येत आहेत माञ रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये जे पोटपाण्यासाठी चोवीस तास रस्त्यावर वाहन चालवतात ? तसेच ज्यांचे उभे आयुष्य चालक म्हणून रस्त्यावर गेले ? ज्यांना रस्त्यावर रात्र अन् दिवस कोणती कुठे काय समस्या येतात? यावर नेमकी काय उपाय योजना करावी ? यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताहमध्ये स्थानिक ट्रक चालक मालक संघटनेला केवळ आपल्या विरुद्ध आंदोलन केल्यामुळे जाणीवपुर्वक जाणूनबूजून डावलणे तसेच ब्लॅक स्पाँट सर्व्हेमध्ये वाहन चालकांना कोणती जागा घातकी आहे ?
अशा प्रकारची उपयुक्त माहिती वास्तवात चालकांना असतांना अशा महत्वाच्या विषयावर चालकांना खरच विचारणा केली गेली का ? याचे उत्तरही आर.टी.ओ. अधिकाऱ्यांनी आता रस्ता सुरक्षा सप्ताहात देणे क्रमप्राप्त ठरु पहात असून याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याचे स्पष्टिरण देणार का ? की, केवळ हा साप्ताहात “वरुन किर्तन आतून तमाशा” होणार ? असा परखड सवालही या निमित्ताने वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे
उत्तर नगरजिल्हा व कोपरगाव तालुका ट्रक चालक – मालक संघटना अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांनी संघटनेच्या माध्यमातून रस्ता अपघाताला आळा बसावा व बेकायदेशीर वाहतूक बंद करावी म्हणून केवळ निवेदनेच दिलेली नसून आंदोलनेही केलेली आहेत माञ प्रादेशिक परिवहन खात्याने नेमकी काय दखल घेतली ? हाच खरा अनाकलनीय प्रश्न असल्याचे मत यावेळी दैनिक प्रभात’शी बोलतांना त्यांनी व्यक्त केला.
रस्ता अपघाताला आळा बसावा विनाकारण निरापराध लोकांचे प्राण रस्ता अपघातातून जावू नये म्हणून अनेकदा विविध सामाजिक संघटनांनी रस्त्यावर चालणारी वाहतूक नियमात सुरु रहावी अनाधिकृत वाहतुकीवर कारवाई करावी लोकशाही मार्गाने निवेदन देवूनही लोकशाही कारभार सुरु असून केवळ रस्ता सुरक्षा सप्ताहातच ज्ञानाचे ढोस पाजण्याचा हट्टहास नेमका कशासाठी असा उद्गिन्न सवालही या निमित्ताने जनतेतून व्यक्त केला जात आहे.