नवी दिल्ली – भारतात रस्ते अपघातामुळे 15.71 ते 38.81 अब्ज डॉलरचे ( एक अब्ज डॉलर म्हणजे 8 हजार कोटी रुपये ) नुकसान होते. ही रक्कम राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.55 ते 1.35 टक्के इतकी असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या जागतिक पातळीवरील बॉश या कंपनीने अभ्यास अहवालात सांगितले आहे की, भारताने अपघात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. 2019 मध्ये भारतामध्ये 7,81,668 इतक्या अपघाताची नोंद झाली.
त्यामुळे व्यावसायिक वाहनांचे 356 दशलक्ष डॉलरचे, कारचे 69 दशलक्ष डॉलर, दुचाकीचे 18 दशलक्ष डॉलरचे तर बसचे 45 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले.
अपघातात जे लाखो लोक सापडतात त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावर, त्यांच्या कुटुंबियांच्या उत्पन्नावर आणि आरोग्यावर परिणाम होता. अपघाताचा तपशीलात अभ्यास जास्त प्रमाणात केला जात नाही. अशा प्रकारचा अभ्यास केल्यानंतर अपघात कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे याचा अंदाज येऊ शकेल असे या अभ्यास अहवालात सांगण्यात आले आहे.