मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एकेकाळी बॉलिवूड गाजवून सोडले होते. निर्माते ट्विंकलसोबत काम करण्यासाठी अक्षरशः लाईन लावून असायचे. मात्र कौटुंबिक जीवनाची सुरुवात केल्यानंतर ट्विंकल सिनेसृष्टीपासून काहीशी दूर गेली. मात्र आता आपल्या वक्तव्यामुळे ट्विंकल चांगलीच चर्चेत आली आहे. युनायटेड किंगडमचा नवीन राजा, राजा चार्ल्स तिसरा याच्या राज्याभिषेकानंतर कोहिनुर हिऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच लाइमलाईटमध्ये आली आहे.
एका मीडिया संस्थेच्या कॉलमसाठी लिहिताना ट्विंकलने पुन्हा एकदा जुन्या कोहिनूरचा वाद समोर आणला आहे. खरं तर, अभिनेत्रीने असे काही लिहिले आहे की भारतीयांनी आपल्या देशाचा असलेला कोहिनूर हिरा युनायटेड किंगडममधून परत करण्याची मागणी सुरू केली आहे. ट्विंकल खन्ना तिच्या कॉलममध्ये युनायटेड किंगडममधून केवळ कोहिनूरच नाही तर ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांनाही परत करण्याबद्दल भाष्य केले आहे.
ट्विंकल लिहिले, ‘पारंपारिकपणे, राणीच्या राज्याभिषेकात कोहिनूर हिऱ्याचा मुकुट परिधान केला जातो. याप्रसंगी राजवाड्याने राज्याभिषेक सोहळ्यात कोहिनूर वापरण्यात येणार नसल्याचे निवेदन जारी केले. यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा कोहिनूर परत करण्याची मागणी करणे थांबवले नाही. मी ब्रिटनला फक्त कोहिनूरच नाही तर आमचे आणखी दोन मौल्यवान रत्न, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनाही परत देण्याबाबत सांगू इच्छिते.
ट्विंकल खन्ना नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहे.अक्षय कुमार सोबत विवाह झाल्यानंतर ट्विंकलने कुटुंबावर लक्ष देण्यासाठी सिनेमांकडे पाठ फिरवली. सध्या ती सिनेसृष्टीपासून लांब असली तरी अधून मधून विऊविध गोष्टींवर भाष्य करताना दिसून येते. ट्विंकलने मिश्कीलपणे मल्ल्या आणि ललित मोदी यांच्याबाबत लिहिले असले तरी सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरत आहे.