मुंबई – करोना महामारीमुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी आज मतदान पार पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 78 टक्के मतदान पार पडले. या ग्रामपंचायतीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुकांत्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. मतमोजणी उद्या पार पाडणार आहे.
जिल्हानिहाय संख्या
पुणे – 17, अहमदनगर- 13, सातारा- 7, नाशिक- 36, धुळे- 41, जळगाव- 20, सोलापूर- 25, सांगली- 1, औरंगाबाद- 16, बीड- 13, परभणी- 2, उस्मानाबाद- 9, जालना- 27, लातूर- 6, आणि बुलडाणा- 5