नवी दिल्ली : प्रशिक्षण केंद्रात सेवा करणाऱ्या जवानावर गरम पाणी फेकणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या उपमहानिरीक्षकाची तडकाफडकी बदली मणीपूर नागालॅंड क्षेत्रात करण्यात आली. प्रकारणाची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्या बदलीच्या आणि कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.
उपमाहानिरीक्षक डी. के. त्रिपाठी यांना नव्या जबाबादारीसाठी शुभेच्छा असे त्यांच्या बदलीच्या आदेशात म्हटले आहे. त्यांची बिहारमधून मणीपूर -नागालॅंड क्षेत्रात बदली करण्यात आली आहे.
हा प्रकार केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बिहारच्या राजगीर येथी प्रशिक्षण केंद्रात या महिन्याच्या सुरवातीला घडला होता. त्यानंत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली.
यात जवान हवालदार अमोल खरात यांचा चेहरा आणि छाती भाजल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्रिपाठी यांच्यावरील कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे.
त्रिपाठी याबाबत म्हणाले, याबाबत एकतर्फी माहिती पसरवली जात आहे. त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. तत्पुर्वी दलातर्फे दिलेल्या अधिकृत निवेदनात, त्रिपाठी यांनी खरातला पिण्यासाठी गरम पाणी आणून देण्यास सांगितले.
त्यावर खरातने थर्मासमधून गरम पाणी आणून दिले. ते अधिक गरम असल्याने त्रिपाठी यांचे तोंड पोळले. त्यावरून त्या दोघांच्यात वाद झाले. त्यावेळी त्रिपाठी यांनी ते गरम पाणी खरात यांच्या तोंडावर आणि जर्सीवर फेकले.
ही घटना अपघात म्हणून नोंदवण्यात आली आहे. त्रिपाठी यांनी चेहऱ्यावर जाणीवपूर्वक पाणी फेकले नाही. वादाच्या भरात ते पाणी त्यांच्याकडून सांडले, असे त्रिपाठी यांनी सांगितले आहे.