शहरातून दोन बस उत्तर प्रदेशला रवाना
जामखेड (प्रतिनिधी) – कोरोनामुळे गेल्या ४५ दिवस झाले तरी जामखेड शहरातील अनेक परप्रांतीय शहरात अडकून पडले होते. शहरात रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आसल्याने त्यांना आपल्या गावी जायचे होते. याच अनुषंगाने प्रशासनाच्या मदतीने तीस परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी रवाना केले. तसेच उर्वरित देखील अडकलेले मजुर टप्प्याटप्प्याने त्यांच्या गावी रवाना करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे जामखेड येथेच पोटापाण्यासाठी आलेले इतर राज्यातील अनेक मजुर अडकून पडले होते. तसेच त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. कोरोना मुळे सर्व कामे बंद आसल्याने पुढे मोठी आर्थिक आडचण निर्माण होईल या भीतीने या परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जायचे होते. याचीच दखल घेत महसूल प्रशासनाने यातील तीस जणांची गावी जाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ४५ दिवस अडकून पडलेल्या या शेकडो परप्रांतीय मजुरांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उत्तर प्रदेशातील ३० मजुरांना घेऊन दोन बस गुरुवार दि ७ मे रोजी जामखेडहुन लखनौकडे रवाना झाल्या तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील लोकांच्या नोंदी झाल्या असून लवकरच अहमदनगरहुन रेल्वेने त्यांना पाठवण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्य़ातील ६० लोकांना पाठवण्याची व्यवस्था चालू आहे.
परराज्यात व दूसऱ्या जिल्ह्यात जाणारे लोक जास्तीत जास्त असतील तर सोय करणं सोप होत आहे. तसे सर्वच मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत मजुरांना गाडीत बसवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.
यावेळी त्यांना नाश्ता ,जेवण पॅकेट्स ,पाणी व मास्क पुरविले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, ना. तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे ,संजय गायकवाड,तलाठी सूखदेव कारंडे, श्रीधर कुलकर्णी, महसूल कर्मचारी उपस्थित होते.