मुंबई – वित्तीय साक्षरता वाढावी याकरिता रिझर्व्ह बॅंकेने पाच कलमी कृती कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी कशा प्रकारची माहिती द्यावी याचा समावेश आहे.
सर्वसमावेशक विकासासाठी वित्तीय साक्षरता तळागाळापर्यंत जाण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या पाच वर्षांपासून सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी. शेअरबाजार, रोखे बाजारासंदर्भातील माहिती प्रसारित व्हावी, याकरिता प्रयत्न केले आहेत.
केवळ शालेय विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षक, महिला, वरिष्ठ नागरिक आणि इतर वर्गासाठी ही अशी माहिती प्रसारित करण्याची गरज आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या पदवी अभ्यासक्रमातही आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद करणाऱ्या बाबी समाविष्ट केल्या जाणार आहेत. यासाठी मोबाइल ऍपसारख्या काही तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे.