नवीदिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.9% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दास यांनी सांगितले की, पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.9% करण्यात आला आहे. ते म्हणाले की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा कमी होती, तरीही ती 13.5% होती आणि कदाचित मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.
रेपो रेट वाढल्याने सर्वसामान्य लोकांवर परिणाम होऊन कर्ज महाग होईल. कारण बँकांचा कर्ज घेण्याचा खर्च वाढणार आहे. यानंतर बँका त्यांच्या ग्राहकांवर बोजा टाकण्याचे काम करतील. याचा परिणाम गृहकर्जावर तर होईलच, शिवाय वाहन कर्ज आणि इतर कर्जही महाग होतील.
RBI Governor Shaktikanta Das announces that RBI “increases the policy repo rate by 50 basis points to 5.9% with immediate effect.” pic.twitter.com/YpDjOVsgus
— ANI (@ANI) September 30, 2022
रेपो दर म्हणजे काय ?
रेपो दर थेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. RBI च्या आजच्या निर्णयानंतर EMI वर देखील परिणाम होणार आहे. रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देण्याचे काम करते.त्यामुळे साहजिकच हा दर वाढल्याने सर्वसाम्यानांवर याचा बोजा देखील पडणार आहे.