जालना – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे अनेकदा त्यांनी केलेल्या विधानावरून चर्चेत असतात. असे असताना पुन्हा एकदा दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना एक विधान केले आहे ज्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका त्यांनी केली होती. यावरून नाभिक समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे.
दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना तिरुपती बालाजी मंदिरातील न्हाव्यांचे उदाहरण दिले. यावरून नाभिक समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. नाशिकमध्ये दानवे यांना माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आज जालन्यात दानवे यांच्या विरोधात नाभिक समाजाने तीव्र निदर्शने केली. यावेळी दानवे यांची अर्धी कटिंग करणाऱ्यास 21 हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्याची घोषणा देखील करण्यात आली.