Ranveer Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लक्षद्वीप येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यांनी येथील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केल होते. पीएम मोदींनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यावरून मालदीवमधील मंत्र्यांनी भारताविरोधात केलेल्या अपमानजनक टीकेनंतर मालदीवविरोधात लाट उठली. यानंतर भारतातील सर्वच दिग्गजांपासून ते सामान्य लोकांनी लक्षद्वीप पर्यटनाला प्रोत्साहन देत मालदीवविरोधात आवाज उठवला.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही (Ranveer Singh) लक्षद्वीपला पाठिंबा देत त्याने ट्वीट केले होते. मात्र या ट्वीटमुळे त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले आहे. रणवीरने लक्षद्वीप समजून मालदीवचाच फोटो ट्वीट केला. त्याची ही चूक नेटकऱ्यांच्या लक्षात येताच त्याच्यावर टीका सुरू झाली. परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर रणवीरने फोटो डिलीट केला आहे. रणवीर सिंहनेही फोटो पोस्ट करत लिहिले होते की, ‘यावर्षी 2024 मध्ये चला भारतभ्रमंती करुया आणि आपल्या देशाच्या संस्कृतीचा अनुभव घेऊया. आपल्या देशाचं सौंदर्य आणि सागरी किनाऱ्यांवर बरंच काही पाहण्यासारखं आहे.’
Ranveer Singh was using Maldives pic to promote Lakshadweep.
He has now deleted the post.
Moye Moye 😂😂 https://t.co/Nn7rDKQxj2 pic.twitter.com/uNffJ9j1AF
— Sachin Sagar (✷‿✷) (@sachin_31sagar) January 8, 2024
हे फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘रणवीर जे सौंदर्य दाखवत आहे ते मालदीवचं आहे’. दरम्यान, मागील काही वर्षांत, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि इतर मोठ्या व्यक्तींमध्ये मालदीवला जाण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. त्यांना पाहून सर्वसामान्य लोकही मालदीवला मोठ्या प्रमाणात फिरायला जातात. या कलाकारांमध्ये दीपिका रणवीर, अक्षय कुमार, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. पण आता एका वादामुळं भारतीय सेलिब्रिटी लक्षद्वीपला जाण्याचं आवाहन करत आहेत.
नेमका कशावरून वाद सुरू झाला?
लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली. प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. रियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स सोशल मीडियावर आपसात भिडले आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी मालदीवला खडेबोल सुनावले.