पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या शतकी आणि विशांत मोरेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडविरूध्द पहिल्या डावात सर्वबाद २८९ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना छत्तीसगडने दुस-या दिवसअखेर ३ बाद १३१ अशी मजल मारली आहे. छत्तीसगडचा संघ अजूनही १५८ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 2: Chhattisgarh – 131/3 in 46.6 overs (Harpreet Singh Bhatia 59 off 107, Amandeep Khare 9 off 43) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2019
गहुंजे येथील एमसीएच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र ऋतुराज गायकवाडच्या १०८, विशांत मोरेच्या ५३ आणि सत्यजित बच्छावच्या ३५ धावांच्या खेळीशिवाय महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कालच्या ६ बाद २३८ वरून पुढे खेळताना महाराष्ट्राला आज फक्त ५१ धावांची भर घालता आली आणि महाराष्ट्राचा डाव २८९ वर आटोपला. छत्तीसगडकरून गोलंदाजीत वीरप्रताप सिंगने ५ तर ओकांर वर्मा आणि पुनीत दाते प्रत्येकी २ गडी बाद केले. अजय मंडलने १ गडी बाद केला.
End Innings: Maharashtra – 289/10 in 95.4 overs (S S Bachhav 35 off 82, M G Choudhary 9 off 13) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2019
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या छत्तीसगडची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या २४ धावांत त्यांचे दोन गडी माघारी परतले. संकलेचाने मोरेकरवी जीनवज्योत सिंगला १४ धावांवर तर चौधरीने खुराणाकरवी अवनीश सिंगला ५ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर आशूतोष सिंग आणि हरप्रीतसिंग भाट्टियाने तिस-या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. आशूतोषला खुरानाने मोरेकरवी ३४ धावांवर झेलबाद करत ही जोडी फोडली.
त्यानंतर भाट्टियाने अमनदीप खरे सोबत डाव सावरत आणखी पडझड होऊ न देता संघाची धावसंख्या १३१ पर्यंत नेली. दुस-या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा हरप्रीतसिंग भाट्टिया ५९ तर अमनदीप खरे ९ धावांवर खेळत होता.