नवी दिल्ली : संघ प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी केलेल्या हिंदुत्वावरील वक्तवव्याने खळबळ उडाली आहे. भागवत म्हणाले होते की, संघ देशातील 130 कोटी लोकसंख्येला हिंदू मानतो. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Union Min Ramdas Athawale on Mohan Bhagwat’s remark ‘130 cr population of India as Hindu society’: Not right to say all are Hindus.There was a time when everyone was Buddhist in our country. When Hinduism came, we became a Hindu nation. If he means everyone is ours then it’s good pic.twitter.com/bXWIsHhDbU
— ANI (@ANI) December 26, 2019
गुरुवारी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘सर्व हिंदू आहेत असे म्हणणे योग्य नाही. एक काळ असा होता की या देशात सर्व बौद्ध होते. पण जेव्हा हिंदुत्व आले तेव्हा आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर भागवत म्हणत असतील सर्व जण आपलेच आहेत तर हि चंगली गोष्ट आहे.
आरक्षणाबाबत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणाले की, आरक्षण हा घटनात्मक हक्क आहे. दलितांकडून कोणीही तो हिरावून घेऊ शकत नाही. आरक्षणावर चर्चा करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान सरसंघाचकल मोहन भागवत यांनी बुधवारी हैदराबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतातील सर्व 130 कोटी लोक संघासाठी हिंदू असल्याचे म्हणाले होते.