पुणे : रणजी स्पर्धेत महाराष्ट्र विरूध्द छत्तीसगड ही लढत बरोबरीत सुटली. शेवटच्या दिवसअखेर दुस-या डावात महाराष्ट्राने ३ बाद १४९ धावावर डाव घोषित करत हा सामना अनिर्णित ठेवला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला ३ गुण मिळाले तर छत्तीसगडला एका गुणावर समाधान मानावे लागले आहे.
Maharashtra vs Chhattisgarh – Match Drawn Maharashtra took first innings lead #MAHvCHH @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/Ru2YYZZne2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 28, 2019
महाराष्ट्राने कालच्या १ बाद ३९ धावसंख्येवरून पुढे खेळताना अखेरच्या दिवशी ११० धावांची भर घातली. दुस-या डावात महाराष्ट्राकडून रूतूराज गायकवाडने ७६ तर सत्यजित बच्छावने नाबाद ५२ धावांची खेळी केली. छत्तीसगडकडून दुस-या डावात गोलंदाजीत सुमित रूईकरने २ तर ओकांर वर्माने १ गडी बाद केला.
End Innings: Maharashtra – 149/3 dec in 68.6 overs (A R Bawane 0 off 7, S S Bachhav 52 off 193) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 28, 2019
तत्पूर्वी, महाराष्ट्राने पहिल्या डावात रूतूराज गायकवाडच्या १०८ आणि विशांत मोरेच्या ५३ धावांच्या जोरावर २८९ धावा केल्या होत्या.
त्यानंतर महाराष्ट्राने छत्तीसगडला पहिल्या डावात २८६ धावांत रोखत ३ धावांची आघाडी घेतली होती. छत्तीसगडकडून पहिल्या डावात हरप्रीत सिंग भाट्टियाने ९०, अमनदीप खरेने ४० आणि अजय मंडलने ३५ धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात गोलंदाजीत संकलेचाने ३, खुराणाने ३ आणि चौधरीने २ गडी बाद केले.