पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राची उद्यापासून तमिळनाडूशी लढत होणार आहे. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या महाराष्ट्राला याही सामन्यातून महत्त्वाचे गुण मिळवण्याची संधी राहणार आहे. यंदाच्या मौसमापासून रणजी करंडक स्पर्धा पारंपरिक आराखड्यातच खेळवली जात असल्याने प्रत्येक संघाला ठरावीक सामने होम व एवे पद्धतीने खेळायला मिळत आहेत.
INDvsSL2023 | विजयी सलामीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना
त्यामुळे या सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. या स्पर्धेत सलामीच्या लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा पराभव करत थाटात सुरुवात केली होती. त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतरच्या लढतीत महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा पराभव केला होता. आसामविरुद्धची लढत अनिर्णित राहिली असली तरीही यातून महाराष्ट्राने महत्वाच्या गुणांची कमाई केली. आता तमिळनाडूशी होत असलेला सामना जिंकला तर महाराष्ट्राला गटात अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.