गुवाहाटी – टी-20 सामन्यांची मालिका जिंकल्यावर आता भारतीय संघ श्रीलंकेशी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे. आज (मंगळवार) या दोन संघात होणाऱ्या सामन्यात नियमित कर्णधार रोहि शर्मासह भारतीय संघाचे सर्व प्रमुख खेळाडू संघात परतले आहेत. टी-20 मालिकेतून विश्रांती घेतलेल्या कर्णधार रोहितसह, विराट कोहली, लोकेश राहुल, महंमद शमी असे सर्व प्रमुख खेळाडू संघात परतल्यामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे.
Maharashtra Kesari | विजेत्याला मिळणार 14 लाखांची महिंद्रा थार आणि ५ लाखांचे रोख बक्षीस
टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. संघात एक किंवा दोन जागांसाठीच चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. रोहितसह राहुलच डावाची सुरुवात करेल. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन फलंदाजीची बाजू सांभाळतील. फिरकीची मदार अक्सर पटेलवरच राहील तसेच त्याने एक फलंदाज म्हणूनही नवी ओळख निर्माण केल्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्चित राहिल.
वेगवान गोलंदाजीत शमी व सिराज यांच्यासह अर्शदीप सिंग किंवा उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेबात बोलायचे तर त्यांचा कर्णधार दासुन शनाकासह चामिका करुणारत्ने व कुशल मेंडीसवरच त्यांची मदार राहणार आहे. गोलंदाजीतही त्यांची बाजू एकट्या वनिंदू हसरंगालाच सांभाळावी लागणार असून अन्य नवोदित कशी कामगिरी करतात यावर त्यांना या मालिकेत यश मिळणार का हे समजणार आहे.
Captain @ImRo45 was all praise for youngsters @ShubmanGill & @ishankishan51 ahead of the #INDvSL ODI series starting tomorrow 👌🏻👌🏻@mastercardindia pic.twitter.com/vlZyeGpChP
— BCCI (@BCCI) January 9, 2023
बुमराहला खेळवणार नाही
अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त ठरला असला तरी त्याला लगेचच या सामन्यात खेळवण्याचा धोका पत्करणार नसल्याचे संकेत संघ व्यवस्थापनाने दिले आहेत. तो मॅचफिट असला तरीही त्याला गेल्या मौसमात दुखापतीमुळे अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. त्यामुळे तो सराव सत्रात कीती फिट आहे हे पाहुनच त्याचा अंतिम अकरा खेळाडूंत समावेश करायचा किंवा कसे ते ठरणार आहे.
शमीकडे लक्ष
बुमराहप्रमाणे शमी देखील गेल्या मौसमात अनेकदा संघातून बाहेर होता. त्याला महत्त्वाच्या मालिका वगळता सातत्याने विश्रांतीच देण्यात आली होती. आता तो एकदिवसीय संघात परतला असल्याने तोच भारताच्या गोलंदाजीची प्रमुख धुरा वाहणार आहे. त्याची तंदुरुस्ती तसेच लय यावरच या मालिकेत लक्ष राहणार आहे.