अयोध्येतील राम मंदिरात आज रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक होणार आहे. या संदर्भात देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. आज सर्वजण दिवाळी साजरी करत आहेत. संपूर्ण देश दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला. माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अभिषेक सोहळ्यात जगभरातून लोक सहभागी होत आहे. कार्यक्रमाच्या राजकीय वादावर ते म्हणाले की, हा भाजपचा अजेंडा असता तर विरोधकांना निमंत्रित केले नसते. त्या सर्वांना आमंत्रणे मिळाली. प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकारण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. इथे विरोधी पक्ष यायला हवा होता. मात्र त्यांनी बहिष्कार टाकला.’ असं म्हणत आठवले यांनी आपलं मत मांडलं आहे.
पहा व्हिडिओ